जयपूर: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये तर लतादीदींचे कोट्यवधी चाहते आहेत. लता मंगेशकर यांचे राजस्थानशी खास नाते आहे. १९९० साली लता मंगेशकर यांनी राजस्थानमधील ‘केसरिया बालम’ हे सप्रसिद्ध गाणं गायलं होतं. ते गाणं १९९१ मध्ये रिलीज झालं होतं. हे गाणं अवघ्या जगभरातील चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. १९९१ मध्ये ‘लेकिन’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता. हे गीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी कम्पोज केलं होतं.

जवळपास तीन दशकांपूर्वी राजस्थानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरीबांच्या मदतीसाठी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी लतादीदी या जयपूरला आल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास ४० हजार प्रेक्षक आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांनी तिकीट काढून सवाई मानसिंह मैदानात प्रेक्षकांमध्ये बसून लतादीदींचे गाणे ऐकले होते. भीषण दुष्काळात पीडितांच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांनी १ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश हरिदेव जोशी यांच्याकडे सुपूर्द केला होता.

एका युगाचा अंत!…लतादीदींच्या निधनानं देशभरातून शोक व्यक्त
लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात: रश्मी ठाकरे

जयपूरमध्ये आज वाहणार लतादीदींना श्रद्धांजली

लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकूल आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजानं प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची हजारो गाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Lata Mangeshkar death Update : लता मंगेशकर यांचे निधन; डॉक्टरांनी सांगितले कारण…
तेरे बिना भी क्या जिना…! संजय राऊत यांची भावूक प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here