अलिबाग: अलिबाग (अलिबाग) तालुक्यातील मिळकतखार मळा ग्रामस्थ गेली ४० वर्षे गावातील रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. मळा ग्रामस्थांनी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रस्ता नाही, तर मत नाही, असा पवित्रा घेतला आहे. याबाबत ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर आणि गावात बॅनरबाजी करून येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मळा गावाच्या रस्त्यासाठी पावले उचलतात का, याकडे लक्ष लागले आहे.

मिळखतखार मळा हे ४० घरांचे आणि दीडशे लोकसंख्या असलेले गाव आहे. ४० वर्षे गावातील ग्रामस्थांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. माध्यमांमध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र तरीही एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याने किंवा लोकप्रतिनिधींनी या गावाला भेट देऊन त्यांची मागणी पूर्ण करण्याबाबत पुढाकार घेतलेला नाही. ग्रामस्थांनी अलिबाग प्रांताधिकारी याच्याकडे रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार प्रांतांनी अलिबाग पंचायत समितीला भूसंपादन विभागाकडे प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती विभागामार्फत लवकरात लवकर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

धक्कादायक! सरपंचानं मागितली होती लाच, पोलिसांनी सापळा रचला अन्…
मुरूडमधील समुद्रकिनारी शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट प्रेक्षकांच्या गर्दीत घुसली; व्हिडिओ बघून हादराल

रस्त्यासाठी आता मळा ग्रामस्थांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी येणारा लोकप्रतिनिधी रस्त्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन गेल्या ४० वर्षांपासून देत आहे. मात्र निवडणूक झाल्यानंतर मळा गावाकडे फिरकतही नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मळा ग्रामस्थांनी कोणालाच मत न देण्याचा निर्णय घेतला आहे. आपले बहुमूल्य मत हे कोणा उमेदवाराला न देता, नोटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता नाही तर मत नाही असे बॅनर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावून आपला निषेध व्यक्त केला आहे.

accused tries to escape : ‘त्या’ आरोपीचा कारागृहातून पुन्हा पळण्याचा प्रयत्न; ३५ फुट दगडी तटबंदीवरून मारली उडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here