औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ‘पंतप्रधान घरकुल योजना’वरून एमआयएमकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून आता आणखीनच राजकारण पेटण्याची शक्यता आहे. कारण, शहरात लावण्यात आलेले हे बॅनर महानगरपालिकेने रविवारी मध्यरात्री काढून टाकले आहेत. तर दुसरीकडे यावरून एमआयएम आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दिवसा काम न करणारे महानगरपालिकेचे पथक रात्री आणि तेही रविवारी सुटीच्या दिवशी काम करत असल्याचा आरोप एमआयएमकडून करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘पंतप्रधान घरकुल योजना’वरून औरंगाबाद जिल्ह्यात एमआयएमकडून, प्रधानमंत्री फेककुल योजना आणि स्वप्नातील घर स्वप्नातचं मिळणार, असे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावले होते. तर महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारीसह केंद्र-राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही योजना अपयशी ठरत असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. त्यानंतर हे बॅनर शहरभरात लावण्यात आले होते.

Weather Alert : पुढच्या ३ दिवसांत राज्य गारठणार, तापमान पुन्हा एकदा १० अंशांपेक्षा कमी होणार
लोकसभेतही मुद्दा गाजला….

पंतप्रधान घरकुल योजनेवरून खासदार जलील यांनी लोकसभेत सुद्धा आवाज उठवला होता. २०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील ८० हजार ५१८ लोकांकडून पंतप्रधान घरकुल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ३५५ लोकांना घरे मिळाली असल्याचा उल्लेख जलील यांनी आपल्या भाषणातून केला होता.

डोक्याला ७० टाके पडेपर्यंत तलवारीने मारलं, कारण वाचून पोलिसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here