मुंबई : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ९२ वर्षांच्या या महान गायिकेच्या निधनाचे वृत्त कळताच केवळ बॉलिवूडवरच नाहीतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली. लतादीदींच्या चाहत्यांबरोबरच राजकीय, सामाजिक, उद्योग, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी लतादीदींना श्रद्दांजली वाहिली. लतादीदींवर दादर येथील शिवाजी पार्कवर संपूर्ण शासकीय इतमामात अत्यंसंस्कार झाले. लतादीदींच्या अत्यंसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित होते. इतकेच नाही तर बॉलिवूडमधील काही कलाकारही उपस्थित होते. परंतु शिवाजी पार्कवरील अत्यंसस्काराला एकही मराठी कलाकार उपस्थित नसल्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार कुठे गेले होते, असा सवाल त्यांना विचारला जातआहे. सोशल मीडियावर उपस्थित झालेल्या या प्रश्नाला आणि मराठी कलाकारांवर होत असलेल्या टीकेला अभिनेत्री हेमांगी कवी हिने सडेतोड उत्तर देत खरी परिस्थिती काय होती हे सांगितले आहे.

‘दीदी आणि मी’ लता मंगेशकरांच्या आठवणीत आशा भोसले यांनी शेअर केला लहानपणीचा फोटोहेमांगी कवी म्हणाली…
दादर, शिवाजी पार्क येथे भारतरत्न लता मंगेशकर यांना साश्रुनयांनी निरोप देण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. त्यावेळी मराठी कलाकार कुठे गेले होते, असा प्रश्न सोशल मीडियावर काही युझर्सनी विचारला. त्याला अनेकांनी अनुमोदन देत मराठी कलाकांवर टीका करायला सुरुवातकेली. युझर्सन विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री हेमांगी कवीने दिले आहे. तिने सांगितले की, ‘सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिले नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप मी आणि अभिजीत केळकर चार वाजल्यापासून तिथे होतो. शेवटपर्यंत आम्हांला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हते. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकले जात होते, तिथे माझी काय गत! आम्ही तिथे कुणी सेलिब्रेटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो…’

लता मंगेशकर मागे सोडून गेल्या कोट्यवधींची संपत्ती; परफ्युम, गाड्या आणि साड्यांची होती आवड
हेमांगीने तिच्या या कॉमेन्टमध्ये पुढे नमूद केले आहे की, आम्हांला ही सरकारी प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितले वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचे दर्शन घेतले! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आले नसावे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here