राजकारण पेटलं…
पंतप्रधान घरकुल योजनेवरून एमआयएमने आक्रमक भूमिका घेत शहरात आंदोलन करत, शहरातील चौकात प्रधानमंत्री फेककुल योजना आणि स्वप्नातील घर स्वप्नातचं मिळणार असे उल्लेख करणार बॅनर लावली होती. तर यावरून भाजपने एमआयएमवर निशाणा साधला होता. त्यातच महानगरपालिकेने एमआयएमने लावलेले बॅनर रातोरात काढून घेतल्याने, एमआयएमने नाराजी व्यक्त करत मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून ‘मोदींच्या महत्वकांशी योजने’वरून शहरात राजकारण चांगलंच तापले आहे.
Aurangabad News : Mim Took An Aggressive Stance The Got A Boost To Pm Modi Importance Scheme | एमआयएम आक्रमक होताच ‘मोदींच्या महत्वकांशी योजने’ला मिळाली जागा
औरंगाबाद : पंतप्रधान घरकुल योजनेवरून गेल्या आठवड्याभरापासून औरंगाबाद शहराचे राजकारण चांगलेच तापले असतानाचं, आता प्रशासनाला उशिराच शहाणपणा सुचले आहे. तर लोकसभेच्या स्थायी समितीने जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश देताच या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी घरकुल योजना राबविण्यासाठी तीन ठिकाणच्या जागांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे जागा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत आवाज उठवला होता.