ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाला उपस्थित राहू शकले नाहीत. मध्यंतरी शाळा, महाविद्यालये सुरू झाली. यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या उद्देशाने शिक्षक वर्गाने अतिजलद गतीने अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजला नाही. त्यातच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे मानसिक तणावाखाली विद्यार्थी आहेत. याचा विचार करत परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, शहराध्यक्ष मंगेश साळवे, प्रतिक गायकवाड, संदिप राजपुत, शुभम नवले, निखिल ताकवाले, रितेश देवरे, गजानन गोमटे, प्रद्युम पराये, रोहित ठेंगे, विकास शेजुळ, अक्षय शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
अशा आहेत मागण्या…
मेपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव करून अभ्यासक्रमातील न समजलेला भाग पुन्हा समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग भरवून ऑफलाइन अभ्यासक्रम शिकविण्यात यावा, अधिकच्या तासिका घ्याव्यात, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याकरिता प्रत्येक शाळा, महाविद्यालयात समुपदेशक नेमण्यात यावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मनविसे शिष्टमंडळाने मंगळवारी विभागीय सचिवांची भेट घेत निवेदन दिले.