भिवंडी: यंत्रमाग नगरी म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या भिवंडीमधील आगीच्या घटनांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच फर्निचर गोदामांना आग लागल्याची घटना घडलेली असतानाच, बुधवारी पुन्हा भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, तिनं भंगाराची २० गोदामे आपल्या कवेत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या गोदामांमध्ये भंगार ठेवले जात होते आणि ते जळून खाक झाले आहे.

भिवंडीतील फातिमा नगर परिसरात आज, बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत मोठी वित्तहानी झाली असली तरी, सुदैवानं कुणीही यात जखमी झालेले नाही. या परिसरात १०० हून अधिक वेगवेगळी गोदामे आहेत. त्यातील अंदाजे २० गोदामे या आगीत खाक झाले, अशी माहिती भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

‘तो’ होता भोंदू बाबा, त्याच्या घरात सापडलेली रक्कम पाहून व्हाल अवाक्
Dombivli : वाद टोकाला गेला, पोलीस ठाण्याकडे जात असतानाच पतीनं ‘तिला’ गाठलं, पुढे घडलं ते भयानक

तत्पूर्वी, आगीच्या घटनेची माहिती मिळताच, सुरुवातीला अग्निशमन बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तब्बल पाच तासांनी म्हणजेच सकाळी साडेअकराच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

धक्कादायक प्रकार! सकाळी मास्क आणि दूध विक्री, रात्रीच्या वेळेस मात्र…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here