जळगाव : जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील तरुणाने पुर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नासाठी तरुणीकडून वारंवार होत असलेल्या मागणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संशयित तरुणीविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय सीताराम इंगळे (२५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. (Love Affair Relationship)

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवासी अजय सीताराम इंगळे हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. गावातीलच २८ वर्षीय तरुणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. अजयने त्यासाठी नकार दिला. मात्र, लग्न करण्याच्या मागणीसाठी तरुणीकडून वारंवार मानसिक छळ होत असल्याने त्यास कंटाळून अजयने काल मंगळवारी दुपारी तीन वाजता सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

पत्नीचा गळा चिरुन फरार झालेला आरोपी 12 तासाच्या आत पोलिसांच्या ताब्यात

अजयच्या आत्महत्येनंतर भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित तरुणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहे.

दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून घरातील तरुण मुलाचा जीव गेल्याने इंगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here