औरंगाबाद: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही करोनानं शिरकाव केला आहे. जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण परराज्यात पर्यटनासाठी गेला होता.

राज्यात करोनाबाधितांची संख्या चारशेपार पोहोचली आहे. शहरी भागासह आता राज्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप करोनाचा रुग्ण सापडला नव्हता. मात्र, आता उस्मानाबाद जिल्ह्यातही करोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण उमरगा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. तो पानिपत येथे फिरायला गेला होता. तेथून तो नुकताच परतला आहे. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. तर त्याच्या पत्नीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here