सांगली : अवकाळी पाऊस आणि थंडीच्या लांबलेल्या मुक्कामानंतरही यंदा आंबा सुमारे १५ दिवस लवकरच बाजारात दाखल झाला आहे. हापूस आणि पायरी आंब्याच्या १६ पेट्या आज सांगलीतील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये दाखल झाल्या. पहिल्याच दिवशी आंब्याच्या एक डझन पेटीला पंधराशे रुपयांचा दर मिळाला. अवकाळी पावसानंतरही यंदा कोकणात आंब्याचे उत्पादन पुष्कळ प्रमाणात असल्यामुळे यंदा खवैय्यांना चांगल्या प्रतीचा आंबा खायला मिळण्याची शक्यता आहे. (Sangali News Update)
दरम्यान, गतवर्षी पडलेला अवकाळी पाऊस आणि करोनाचा फटका आंब्यालाही बसला आहे. लवकर बहरलेला आंबा अवकाळीमुळे खराब झाला, तर अवकाळीनंतरच्या बहराचा आंबा चांगला असल्याचे कोकणातील शेतकरी आणि व्यापारी सांगतात. यंदा लवकरच हापूस आंब्याचे आगमन झाल्याने दरही चांगला मिळेल, अशी आशा फळ विक्रेते व्यापाऱ्यांना आहे.