२६ मार्च रोजी चेंबूरच्या साई रुग्णालयात या महिलेला आणि तिच्या पाच दिवसाच्या बाळाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर या मुलाच्या वडिलांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांनाही तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. या दोघांवर कस्तुरबामध्ये उपचार सुरू असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून मुलाच्या वडिलालाही कस्तुरबामध्ये क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. काल या तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पुन्हा या तिघांची टेस्ट केली जाणार आहे. त्यांचा हा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यास या तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
खासगी लॅबद्वारे करण्यात आलेल्या चाचणीत जे सँपल पॉझिटिव्ह दाखविले जातात, त्याची आम्ही पुन्हा एकदा चाचणी करतो, असं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. दरम्यान, ज्या खासगी रुग्णालयात करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा रुग्णालयांना सील केले आहे. दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४१६ वर गेली आहे. कालच्या एका दिवसात राज्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होत असले तरी संसर्गाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times