अहमदनगर : किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला विरोध करणारी पत्रे भाजप महिला आघाडीने सरकारला पाठवली आहेत. किराणा दुकानांत महिलांचा जास्त वावर असतो. त्यांच्यासमोर वाइन विक्री झाली, तर त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशा आशयाची पत्रे महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पाठवली आहेत.

नगर शहर भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करत ही पत्रे पाठविली आहेत. शहरातील लक्ष्मी कारंजा येथील पत्रपेटीत महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी ही पत्रे पाठवली.

देशी दारू विकणाऱ्यांना वाइनबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, शिवसेनेने विखे-पाटलांना सुनावले
भाजप खासदाराकडून अण्णा हजारेंवरील टीकेला प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

राज्य सरकारने घेतलेला निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला तळीरामांचा महाराष्ट्र बनवणारा आहे. किराणा दुकानांमध्ये प्रामुख्याने महिलांचीच ये-जा असते. महिलांसमोर जर वाइन विक्री झाली तर महिलांमध्ये लज्जा उत्पन्न होईल. लहान मुले व युवकही आपली संस्कृती सोडून व्यसनाधीन होतील. राज्यातील सरकार नागरिकांच्या हिताच्या ऐवजी चुकीचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जर हा निर्णय झाला असेल, तर पुढील काळात शेतात गांजा पिकवण्यासही सरकार परवानगी देईल. सत्ताधाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. सरकारच्या या निर्णयाला महिला भाजप तीव्र विरोध करत असून जर सरकाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर महिला रस्त्यावर उतरतील, असा इशारा पत्रांद्वारे देण्यात आला.

किमान महाराष्ट्रात तरी लोकशाही येईल; अण्णा हजारेंचं मोठं विधान

यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सुरेखा विद्ये, सरचिटणीस प्रिया जानवे, नगरसेविका पल्लवी जाधव, मध्य मंडल अध्यक्षा सविता कोटा, सावेडी मंडल अध्यक्षा सुप्रिया दापोलकर, प्रा.डॉ.सुपर्णा देशमुख उपस्थित होत्या. राज्यात एकीकडे ग्रामीण भागांमध्ये महिला दारूबंदीसाठी आंदोलने करत आहेत. त्यास मोठ्या प्रमाणात यशही येत आहे. असे असताना सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. केवळ महासुलासाठी हा चुकीचा निर्णय सरकारने घेतला आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देणे आवश्यक आहे. जर सर्रास दारू विक्री झाली तर, आधीच नैराश्यग्रस्त असलेली आपली युवा पिढी अधिक व्यसनाधीन होत भरडली जाईल, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here