औरंगाबाद : देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काल रात्री मोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आले. ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमींसह औरंगाबादकरांनी मोठी गर्दी केली होती. मात्र अनावरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच मीडियासाठी तयार करण्यात आलेला स्टेज अचानक कोसळला. पण यावेळी पत्रकारांच्या समयसूचकतामूळे तीन बालकं थोडक्यात बचावले.

रात्री १० वाजेपासून कार्यक्रमाला सुरवात झाली. महाराजांच्या पुतळ्यापासून चारही दिशांच्या १ कि.मी. हून अधिक अंतरापर्यंत असलेला हजारो शिवप्रेमींचा शिवसागर या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. पण यावेळी गर्दीच्या रेट्यामुळे मीडियासाठी तयार केलेला स्टेज अचानक कोसळला. विशेष म्हणजे स्टेज कोसळण्याच्या अंदाज आल्याने पाच मिनिटांपूर्वी स्टेजवर बसलेल्या तीन चिमुकल्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे पत्रकार मोसीन शेख आणि टिव्ही पत्रकार माधव सावरगावे यांनी समयसूचकता दाखवत मुलांना स्टेजवरून उतरून घेण्याच पालकांना सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.यात काही पत्रकारांना मार लागला आहे.

Shivjayanti 2022 : शिवजन्मोत्सव दणक्यात होणार, ‘असे’ असतील कार्यक्रमाचे नियम
शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंच पुतळा

पुतळ्याची २१ फुट उंची आहे, पुतळ्याचे वजन ०७ मेट्रीक टन आहे, पुतळ्यासाठी ब्रांझ धातु वापरण्यात आलेला आहे, पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची ३१ फुट आहे, चौथाऱ्यासह पुतळ्याची एकुण उंची ५२ फुट, चौथाऱ्याचे बांधकाम आर. सी. सी. मध्ये असुन चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग करण्यात आले आहे, चौथाऱ्याभोवतीच्या २४ कमानीत २४ मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत.

चौथाऱ्याभोवती कारंजे तयार करण्यात आलेले असून, हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, नविन अश्वारूढ पुतळा तयार करण्यासाठी एकूण ९८.०० लक्ष रुपयांचा खर्च आला असून, चौथाऱ्याच्या बांधकामासाठी २५५.०० लक्ष रुपयांचे खर्च आले आहे. तसेच एकुण अंदाजपत्रकिय रक्कम ३५३.०० लक्ष होती.

हे तर गांजाचं ‘डम्पिंग ग्राउंड’! ‘या’ ठिकाणाहून राज्यात होतेय गांजाची तस्करी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here