औरंगाबाद : ग्राहकाच्या खात्यातील रक्कम परस्पर वळवणे आणि या प्रकरणात जबाबदारी झटकणाऱ्या एचडीएफसी बँकेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला. बँकेने ग्राहकाला ही रक्कम ६ टक्के व्याजासह ३० दिवसांत परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी पाच हजार आणि खर्चापोटी एक हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्सूल सावंगी येथील राजेंद्र चौधरी यांच्या एचडीएफसी बँकेत असलेल्या खात्यातून १८ ऑगस्ट २०२० रोजी २९, २९२ आणि ३,९९२ रुपये परस्पर वळते करण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी चौधरी यांनी तात्काळ बँकेकडे याविषयीची तक्रार दिली. त्यांना ऑनलाइन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, ऑनलाइन तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर चौधरी यांनी थेट जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत आपली तक्रार दाखल केली.
भयंकर! हुंड्यासाठी सासरच्यांनी केले अमानुष कृत्य; गर्भवती सुनेच्या पोटावर बॅग मारली अन्…

यानंतरही ग्राहकाचा दावा बँकेने फेटाळून लावला. ग्राहकानेच त्याचा ओटीपी अथवा पीन क्रमांक शेअर केल्याचा दावा बँकेने केला. तसेच यूपीआय सिस्टीमधून रकमेचा व्यवहार झाल्याचे म्हणणे बँकेने आयोगा समोर सादर केले. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, ग्राहकाच्या तक्रारीचे निराकरण करणे बँकांना बंधनकारक असते. पण बँकेने नियमांचे पालन केले नाही आणि कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदविले. सुनावणीअंती आयोगाने बँकेला दणका देत, ग्राहकाला ही रक्कम ६ टक्के व्याजासह ३० दिवसांत परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी पाच हजार आणि खर्चापोटी एक हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे.
दुष्काळात तेरावा महिना! आधीच भाव नाही त्यात चोरट्यांचा मोसंबीवर डाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here