श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केलाय. भारतीय सुरक्षा दलांच्या जवानांनीही पाकच्या गोळीबाराला उत्तर दिलंय. पण पाकच्या गोळीबार राजौरी जिल्ह्यात भारताचे ६ जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. या संकटावरून लक्ष हटवण्यासाठी पाककडून सीमेवर हा गोळीबार सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.

पाकिस्तानने पूंछ जिल्ह्यात सीमेवर शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान गेळीबार सुरू केला. हलक्या तोफांनी आणि स्वयंचलीत शस्त्रास्त्रांनी पाकने गोळीबार केला. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

राजौरीत ६ जवान जखमी

या आधी पाकने राजौरीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबारात केला. यात भारतीय लष्कराचे सहा जवान जखमी झाले आहेत. यात लष्कराचे ४ आणि बीएसएफच्या दोन जवानांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुंदरबन क्षेत्राला लक्ष्य करून पाकिस्तानने गोळीबार केला होता. यामध्ये सहा जवान जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि उपचार सुरू आहेत.

करोनाने पाकिस्तानात नागरिकांचे हाल

पाकिस्तानमध्ये करोनाचे संकट गहिरे झाले आहे. रुग्णांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. हॉस्पिटल्समध्ये मास्क, कर्मचारी आणि व्हेंटिलेटर्सची मोठी कमतरता आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था करोनाने रसातळाला जाईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here