औरंगाबाद : वैजापुर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी गेल्या आठवड्यात एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी पोलिसांनी आमदारांना वाचवण्यासाठी जामीनपात्र गुन्हे दाखल केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी आज महिलेला मारहाण झालेल्या घटनास्थळी भेट देत, पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्यात, अडीशे-तीनशे लोकांसमोर एका महिलेला गुरासारखी मारहाण झाली. त्या मारहाणीच्या अनुषंगाने जी कलम लावायला पाहिजे होती ती कलमे न लावता पोलिसांनी जामीन पात्र असे कलम लावली आहे. त्यामुळे महिलेला मारहाण करून सर्व लोकं बिनधास्त बाहेर फिरतायत, पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी लावला. तसेच पोलीस दलात येतांना काही पोलिसांनी नक्की कुणाच्या शपथा खाऊन पोलीस खात जॉईन केलं असा प्रश्न मला पडला असल्याचं वाघ म्हणाल्या. त्यामुळे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा ज्याचा कुणाचं सरकार असेल त्यांचं मिट खाऊ आणि त्यांच्याबरोबरच इमानी राहू अशी काही मंडळी पोलिसात आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

शुक्रवारपर्यंत मराठीत फलक करा, ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा
कर नाही तर मालिकांना डर कशाचं…

नवाब मालिकांवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्यात की, मला वाटतं दाउद मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जरी ही चौकशी असेल तर हे गंभीर आहे. यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनेक पुरावे दिले होते. त्यामुळे जर पुरावे समोर येत असेल आणि कारवाई होत असेल तर गैर काय असं चित्रा वाघ म्हणाल्यात. तसेच मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत जोपर्यंत ईडीकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही असे चित्रा वाघ म्हणाल्यात.

Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाची वातावरण, उद्या ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here