मुंबई : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक खूपच व्यग्र आहे. नुकतीच एक अशी बातमी आली होती की, विश्वचषकापूर्वी टीम इंडिया आणखी तीन दौरे करणार आहे आणि त्यामुळे वेळापत्रक खूपच व्यग्र झाले आहे. यासाठी भारताचे दोन संघ तयार केले जाऊ शकतात. याआधीही जेव्हा भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा दुसऱ्या संघाने श्रीलंकेतील मालिकेत भाग घेतला होता.

माध्यमांतून प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध एकमेव टी-२० सामनाही खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर संघ वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल आणि त्यानंतर यूएईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आशिया चषकात सहभागी होणार आहे. गेल्या वेळी आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती.

मिताली राजने मोडला धोनीचा विक्रम; विराट कोहलीला टाकले मागे
India vs Sri Lanka, 1st T20I Live at Lucknow : भारतीय सलामीवीर तळपले, इशानचे अर्धशतक, लाइव्ह अपडेट्स

एक भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “बायो-बबल ब्रेक्सबद्दल चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडूला व्यस्त वेळापत्रकाची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांना कधी विश्रांती घ्यायची आहे, याचा विचार करण्यासाठीही वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुसरा भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार, असे वाटत आहे. आशिया चषक ही पहिलीच स्पर्धा असेल, जिथे भारत टी-२० विश्वचषकापूर्वी संघाचे संयोजन तयार करण्यासाठी पहिला संघ मैदानात उतरवेल.

महिला विश्वचषकाच्या नियमांमध्ये धक्कादायक बदल; वाचा सविस्तर बातमी

दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघ आयपीएलनंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. ९ ते १९ जून या कालावधीत दोन्ही देशांमध्ये पाच टी-२० सामने खेळवले जातील. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ बर्मिंगहॅममध्ये कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर संघाला इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. शेवटचा एकदिवसीय सामना १७ जुलै रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here