औरंगाबाद : नवाब मालिकांची ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर आज औरंगाबाद महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी आंदोलनात शिवसेनेचे मोजके नेते आणि पदाधिकारी सोडले तर इतर कार्यकर्त्यांनी मात्र आंदोलनातून कल्टी मारल्याचं पाहायला मिळालं. पण माध्यमांनी लक्ष वेधताच तात्काळ शिवसेनेचे रुमाल आणून कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालून, सावरासावर करण्यात आली.

शहरातील क्रांती चौकात सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणे आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी आंदोलनात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे झेंडे पाहायला मिळाले. पण शिवसेनेचा ना झेंडे होते ना कार्यकर्त्यांची गर्दी होती. मोजके नेते आणि मोजके पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या आंदोलनापासून शिवसेना कार्यकर्त्यांनी दूर राहणं पसंद केलं.

Ukraine Russia News : राज्याचं टेन्शन वाढलं, युक्रेनमध्ये मराठवाड्यातील ६२ विद्यार्थी अडकले
…अन् तात्काळ उपरणे मागवले

धरणे आंदोलनात राष्ट्रवादी- काँग्रेसचेच झेंडे आणि उपरणे दिसत असल्याने शिवसेना आंदोलनात सहभागी नाही का ? असा मुद्दा माध्यमांनी उपस्थितीत करताच शिवसेना नेत्यांनी तात्काळ शिवसेनेचे उपरणे मागवून घेतले. पण झेंडे काही मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेचा सावरासावरीची चर्चा आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे.

अत्याचार प्रकरणात मेहबूब शेख यांची पुन्हा चौकशी सुरू; मेडिकल करत जबाबही नोंदवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here