औरंगाबाद : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले आजपासून ( २६ फेब्रुवारी ) आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध मराठा संघटना आणि तरुणांचा पाठिंबा मिळत असून, हजारो तरुण मुंबईत दाखल होणार आहे. तर संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातून ५ हजार तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणाले की, समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ हजार मराठा तरुण मुंबईला रवाना झाले आहेत. ज्यात औरंगाबादचे १ हजार तरुणांचा समावेश आहे. तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा बॅनर बाजूला ठेवून आम्ही आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही देशमुख म्हणाले.

मनसेचा १६वा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर होणार, राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
शहरातही अन्नत्याग आंदोलन…

संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईत जाणार आहे. मात्र, ज्यांना मुंबईत जाणे शक्य नाही ते औरंगाबादच्या क्रांती चौकात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यात असेच अन्नत्याग आंदोलन करून संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.

Russia Ukraine War: युक्रेन शरण जाणार की लढत राहणार?; झेलेन्स्की यांच्या ताज्या व्हिडिओने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here