मुंबई: युक्रेनमध्ये रशियाने हल्ले सुरूच ठेवले आहेत. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनच्या काही भागांत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येने भारतीय नागरिक राहत आहेत. जवळपास २० हजार नागरिक युक्रेनमध्ये आहेत. यात सर्वाधिक संख्या ही विद्यार्थ्यांची आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडून मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी विनंतीही केली आहे. आता या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात येत असून, रोमानियामार्गे भारतात आणण्यात येत आहे. रोमानियातून जवळपास ३०० विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत येणार आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज रात्री विमान उतरेल, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी मुंबईत येणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर काय नियम असतील, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

russia ukraine news : युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी मुंबईतून विमानाचे उड्डाण, पुतीन यांचे सुरक्षेचे आश्वासन
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रहिवासी इमारतीवर कोसळली मिसाईल; स्फोटानं कीव्ह हादरलं

महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये महाराष्ट्राचे बरेच विद्यार्थी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत खूपच सकारात्मक भूमिका घेतली असून, सर्वांनाच मायदेशी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्याकडून एअर इंडियाचे विमान रवाना झाले आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येईल. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना कुठलेही बंधन असणार नाही. ज्यांचे झाले नसेल, त्यांची मोफत चाचणी करण्यात येईल. त्यांना क्वारंटाइन केलं जाणार नाही. त्यांच्या घरी राहू दिलं जाईल. त्यांची मानसिक अवस्था कशी असेल? ते प्रचंड घाबरले असतील. त्यांना ‘वेलकम’ करणे, त्यांना आल्या आल्या जेवण, स्नॅक्सची आवश्यकता असेल तर ते देणे आदी तयारी महापालिकेने केली आहे. त्यांना प्रसन्न वाटावं म्हणून गुलाबाचे फुल वगैरे देऊन स्वागत केले जाईल. मुंबईतून ते कुठे जाणार आहेत ? त्यांची माहिती घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवलं जाईल.’

ukraine russia news : युक्रेनची महिला रशियन सैनिकाला भिडली!, ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे रेस्क्यू ऑपरेशन

शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना रस्तेमार्गे युक्रेनमधून बाहेर काढून रोमानियाला घेऊन येण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. युक्रेनमध्ये राहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी तेथील भारतीय दूतावास प्रयत्नशील आहेत. अखेर युक्रेनमधून पहिल्या टप्प्यात ३०० विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशात आणण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपले पालक आणि भारत सरकारकडे मदत मागितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here