जालना : गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पण अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी प्रशासनाकडून बडतर्फेची कारवाई करण्यात आली. पण तरीदेखील असंख्य कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पण यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं एसटी कर्मचाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

धक्कादायक! बीडच्या बेलेश्वर संस्थानाच्या मठाधिपतींना धमकीचा फोन
दरम्यान, यावेळी बोलताना एसटी संप जास्त ताणू नका असा सबुरीचाही सल्ला राजेश टोपे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करणार असून आता एसटी चालवण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवावे लागत आहेत. या पार्श्वूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त ताणू नये असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

जालना जिल्ह्यातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राजेश टोपे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर टोपे यांनी हे आवाहन केलं. याआधी देखील परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार असून एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त न ताणवता चर्चेने मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटल आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशीदेखील या विषयासंदर्भात चर्चा केली जाईल अशी खात्री टोपे यांनी दिली आहे.

धक्कादायक ! ‘त्या’ दोन बिबट्यांवर विषप्रयोगाचा संशय; वन विभागाने तिघांना घेतलं ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here