मुंबई: महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजप कमालीचा आक्रमक झाला आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांकडूनही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपनं लावून धरली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कमालीचे आक्रमक झाले होते. अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कसा? असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी एका मिनिटांत मलिक यांची हकालपट्टी केली असती, असं फडणवीस म्हणाले.

अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर त्याला उत्तर म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनीही विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा दिल्या. मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा सत्ताधाऱ्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या मागणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

राज्यपालांनी शिवाजी महाराजांचं नाव उच्चारताच सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी; एका मिनिटात भाषण आटोपलं
Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी आणखी वाढणार; मुंबईत बीकेसीत २०० कोटींचा भूखंड असल्याची माहिती

राज्याच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कायम आहे. आमची अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे. त्यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. बाळासाहेब ठाकरे असते तर, एका मिनिटांत त्यांची हकालपट्टी केली असती, असे फडणवीस म्हणाले.

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा. संजय राठोड यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर घेतला. पण मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना, नेमके मलिकांना वाचवण्याचे कारण काय? त्यांच्यामागे कोण आहेत? कुणाच्या दबावाखाली मलिक यांना वाचवले जातेय? हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत. आम्ही सरकारला जाब विचारला आहे. सरकार पळ काढतंय, त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. हे दाऊद समर्पित सरकार आहे, दाऊद शरण सरकार आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नात फडणवीसांनी कोणाशी हात मिळवला होता; अमोल मिटकरींचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here