हिंगोली : हिंगोली जिल्ह्यासह इतरही भागात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असून उन्हाची तीव्रता देखील कमी झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, वादळी वारेही वाहू लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. ७ व ८ मार्च रोजी आकाश ढगाळ राहील. ८ मार्च औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काढणीस तयार असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांची काढणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी. तसेच पिक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात ९ ते १५ मार्चपर्यंत कमाल तापमानात मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

महिला दिनी पर्यटक निवास आरक्षणात ५० टक्के सवलत, एमटीडीसीची विशेष योजना
शेतकऱ्यांनी वादळी वारे व या स्वरूपाचा पाऊस लक्षात घेऊन पशुधनास मोकळ्या जागी तसेच पत्र्याच्या खोलीत बांधू नये, सुरक्षित ठिकाणी पशुधनास बांधावे. सिद्धांत पावसात भिजल्यास त्यांना ताप येण्याची शक्यता अधिक असते.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात सध्या हरभरा, गहू त्याची कापणी सध्या वेगाने सुरू आहे. बरोबर काही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक काढून वाळू घातले आहे. हेच असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकाधिक वाढू लागली आहे.

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर महागले, वाचा काय आहे आजचा भाव?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here