म. टा. खास प्रतिनिधी,

मुंबई बेस्ट उपक्रमाने आपत्कालीन स्थितीत काम करणाऱ्यांना दैनंदिन ३०० रु. विशेष भत्ता देतानाच अनुपस्थित कामगारांना मात्र मेमो देण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधितांची ने-आण करण्यासाठी सेवेत असलेल्या यामुळे कात्रीत अडकला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही अजूनही पुरेशा साधन सुविधा नसतानाही कामगार कामावर येत आहेत. त्यात दूर अंतरावर राहणाऱ्या कामगारांना सेवेत येणे अडचणीचे ठरत आहे. अशा कामगारांनाही मेमो दिला जात असल्यास कामगारांमध्ये नाराजी पसरण्याची भीती आहे.बेस्टकडून अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा चालविली जात आहे. त्यात चालक, कंडक्टरसह इतर कामगारांचा समावेश आहे.

सध्या सुमारे ६० टक्के कामगार कामावर येत असून ४० टक्के कामगारांना कामावर येणे अवघड ठरले आहे. पालघरसह विविध भागांत राहणाऱ्यांसमोर कामावर जायचे कसे, हाच एक प्रश्न आहे. तरीही प्रशासनाकडून कामगारांना मेमो देण्यास सुरुवात झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यास तीव्र विरोध होण्याचीही शक्यता आहे.एकीकडे जीव धाक्यात घालून सेवा बजाविणाऱ्या कामगारांना दैनंदिन सेवेसाठी प्रति दिवशी ३०० रुपये भत्ता देण्याची मागणी कामगार संघटनांकडून सुरू होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत बेस्ट प्रशासनाने २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी दैनंदिन सेवा बजाविणाऱ्या कामगारांना ३०० रु.चा भत्ता जाहीर केला आहे. ही बाब चांगली असतानाच मेमो देण्याचा अट्टहास मागे घेण्यात यावा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि कार्याध्यक्ष अॅड. उदय आंबोणकर यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here