औरंगाबाद : राज्यात पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, आज औरंगाबादच्या काही भागांमध्ये प्रत्यक्षात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली असून, रब्बी हंगामाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देत औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला होता. दरम्यान, आज ५ वाजेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील काही गावांमध्ये प्रत्यक्षात पावसाला सुरवात झाली आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी, शॉर्ट सर्कीटच्या आगीत १०० एकरावरील ऊस जळून खाक
शेतकरी पुन्हा अडचणीत…

आधी अतिवृष्टी त्यानंतर अवकाळी पाऊस या सर्वातून सावरत बळीराजा पुन्हा एकदा कंबर कसून उभा राहिला असतानाच आता पुन्हा एकदा आवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. गहू, हरभऱ्यासह अनेक रब्बीच्या पिकांना याचा फटका बसणार आहे. आशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगावं असा प्रश्न बळीराजाला पडत आहे.

कमी शेतीत लाखोचं उत्पन्न, मोसंबीच्या बागेने शेतकऱ्याचं आयुष्य बदललं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here