वाचा: देवेंद्र फडणवीसांच्या कारवर चप्पलफेक, रोहित पवार म्हणाले…
नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू आहे. देहरेगावाजवळ काम अर्धवट आहे. अवजड साहित्य घेऊन जाणारी वाहने रात्रीच्या वेळी प्रवास करतात. देहरे गावाजवळ काम सुरू असलेल्या भागातून ही दोन्ही वाहने जात होती. कंटेनर वरच्या बाजूने, तर त्याच्या शेजारून अपघातग्रस्त बोलेरो जीप जात होती. तेव्हा खराब रस्त्यामुळे कंटेनरला हेलकावा बसला. त्यामुळे त्यावरील कित्येक टन वजनाचे पंख्याचे पाते बोलेरोवर पडले. यामध्ये मोटारीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये दबले जाऊन दोघे ठार झाले.

अहमदनगर अपघात
वाचा: युद्धामुळे पेट्रोल महागणार? नगरच्या वकिलांनी केली ‘ही’ तयारी
अपघातानंतर रस्त्यावर पाते पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाते बाजूला करण्यासाठी आलेल्या क्रेनलाही ते उचलत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या मोठ्या क्रेनच्या सहायाने पाते उचलून बाजूला करावे लागले. त्यानंतर दुपारच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.