मुंबई : विरोधकांना नामोहरम करण्याचा कट कसा रचला जातोय, हे उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी भाजप नेते अॅड्. आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी आशिष शेलार यांनी संवाद साधला. ‘हा महाभयंकर कट असून, विरोधी पक्षनेते ‘देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणाचा गैरवापर या सर्व बाबींचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

BJP Morcha : भाजपचा मोर्चा अडवला; देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मोर्चा मलिकांच्या राजीनाम्यासाठी, फडणवीसांचं BMC निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठं वक्तव्य

सरकारी वकिलांची देखील सुरक्षा वाढवावी

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाबद्दल होते. त्या कटाचा मास्टरमाइंड विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आहेत. त्यामुळे विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्याशी कोणाच्या गाठीभेटी होत आहेत. कोणत्या व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अथवा घरी जात आहेत? यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या कटाचे मास्टरमाइंड चव्हाण असल्याने त्यांचीही सुरक्षा महत्त्वाची असून राज्य सरकारने विशेष सरकारी वकील यांना देखील अधिक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.

ईडी आणि सीडी दोन्ही लावलं; एकट्या फडणवीसांनी तीनही पक्षांना घाम फोडला

‘अजून पुढचे बरेच अंक बाकी’

‘लाव रे तो व्हिडिओ’ काय असतो, ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दाखवून दिले. सरकारच्या भयंकर कटाचे वगनाट्य उघड करून ठाकरे सरकारचे त्यांनी ‘वस्त्रहरण’ केले. नाटकातील “तात्या सरपंच” कोण? मंजुळाबाई कोण? गोप्या कोण? मास्तर कोण? अजून पुढचे बरेच अंक बाकी आहेत, असे खोचक ट्विट करून आमदार शेलार यांनी सरकारवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here