मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांचा विकास करणारा आणि राज्याला पुढे नेणारा असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प राज्याला विकासाची नवी दिशा दाखवणारा आहे. महाविकासआघाडी सरकारने राज्याचा विकास करण्याचा, राज्याला पुढे नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला. हा अर्थसंकल्प त्यादृष्टीने पहिलं पाऊल ठरेल. आतापर्यंत सरकार म्हणून जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच मी ठामपणे सांगतो की, हा अर्थसंकल्प राज्यातील सर्व घटकांचा, बांधवांचा विकास करणारा आणि आधार करणारा ठरेल. जनता या अर्थसंकल्पाचे नक्की स्वागत करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते शुक्रवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Budget 2022)
Maharashtra Budget LIVE: सीएनजी स्वस्त होणार?; सीएनजीवरील कर १३. ५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुरुवारी केंद्र सरकारने महाराष्ट्राची ३००० कोटी रुपयांची थकबाकी दिली. मात्र, अद्याप २६५०० कोटी रुपयांची थकबाकी कायम असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

ठाकरे सरकारची महिलांना मोठी भेट

सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आल्यााची माहितीही त्यांनी दिली.

ठाकरे सरकार एसटीलाही पंचत्वात विलीन करेल, अशी भीती वाटते: फडणवीस

कळसूत्री ठाकरे सरकारने पंचसूत्री अर्थसंकल्पात मांडण्याचा प्रयत्न केला. ठाकरे सरकारला आता पंचसूत्री वगैरे गोष्टी आठवायला लागल्या आहेत. मला भीती वाटते की, ठाकरे सरकार एसटी महामंडळालाही पंचत्वात विलीन करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here