मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील करोना लाट पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र सध्या तरी दिसतेय. राज्यात रविवारी शून्य करोना मृत्यूची नोंद झाली. मार्चमधील ही चौथी वेळ आहे. दुसरीकडे, राज्याची राजधानी मुंबईतही करोनाने एकाही रुग्णाची मृत्यू झालेला नाही. या आठवडाभरात मुंबईत एकही करोना मृत्यूची नोंद झाली नाही.

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात आणि मुंबईत करोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २४ तासांत राज्यात २५१ नवीन करोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले. मुंबईत ४४ नवीन रुग्ण आढळले. तर चार रुग्णांना रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Coronavirus in Mumbai and Maharashtra : मुंबईसह महाराष्ट्राला मोठा दिलासा; ‘अशी’ आहे स्थिती
coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट

‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्याचे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, ”मुंबईत आठवडाभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ही एक चांगली बाब आहे. लोकांनी मास्कचा वापर केला पाहिजे.” दरम्यान, मुंबई महापालिकेच्या दैनंदिन अहवालानुसार, ९१ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मुंबईसह महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

मुंबईत ४४ नवे रुग्ण

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात रविवारी ४४ नवीन करोना रुग्णांचे निदान झाले. तर, एकूण ४६ रुग्ण बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. मुंबईतील एकूण बरे झालेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या १०,३७,३४२ इतकी आहे. मुंबईत एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६, ६९२ इतकी झाली आहे.

Mumbai Corona Update news : मुंबईत करोना रुग्णसंख्या घटली, एकही मृत्यू नाही; ‘अशी’ आहे ताजी स्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here