नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( supriya sule ) यांनी जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आम्हाला काश्मीर खूप आवडतं. या पृथ्वीवर जिथे कुठे स्वर्ग आहे तो काश्मीरमध्ये आहे. आम्ही परदेशात जात नाही, पण लहान असल्यापासून काश्मीरला फिरायला जातो. काश्मीरला भेट देतो. आम्ही सहकुटुंब काश्मीर फिरतो. यामुळे काश्मीर हे आमचे फिरण्याचे आवडते ठिकाण आहे, असे त्या म्हणाल्या. काश्मिरी पंडांतांवर झालेल्या अन्यायावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ( jitendra singh ) हे भरभरू बोलले. पण दिल्लीत काश्मिरी मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलला नोटिसा पाठवल्या जातात? विद्यार्थ्यांना शिकवणारे कोण आहेत? शाळेच्या फी बाबात विचारलं जातंय? सरकार शाळेला नोटिसांवर नोटिसा पाठवून खरंच काश्मिरी पंडितांना मदत करतंय का? जे काश्मिरी पंडित आता अडचणीत आहेत, त्यांसाठी काम करण्यासाठी सरकारची खरंच इच्छा आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. या शाळेत ५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. मग त्यांच्याबद्दल जितेंद्र सिंह यांना कुठल्याही वेदना नाहीए का? असं म्हणत दिल्ली पब्लिक स्कूल चालवणारे धर हे मराठी आहेत. आपण या कुटुंबाला ओळखतो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. गतीमंद मुलेही त्या शाळेत शिकतात. केंद्र सरकार अशा शाळेला अशी वागणूक देतंय. हेच सरकारचे कश्मिरी पंडितांबद्दलचे प्रेम आहे का? असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सरकारचं काश्मिरी पंडितांबद्दलचं प्रेम बेगडी असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला . इतिहासात जाऊ नका. ७० वर्षांपूर्वी काय घडलं? हे आता उकरून काढून चालणार नाही. आम्ही तर जन्मालाही आलो नव्हतो तेव्हा. यामुळे इतिहासात आपण किती काळ अडकून राहणार आहोत. दुसऱ्यावर किती आरोप करत राहणार? असे सुप्रिया सुळे यांनी सुनावले.
इतिहासात न अडकता वर्तमान परिस्थितीतून मार्ग काढून पुढे गेले पाहिजे. आपण एक भारतीय म्हणून काश्मिरी पंडित आणि काश्मिरी नागरिकांच्या वर्तमान आणि भवितव्यासाठी काय करतोय? हे आताच्या स्थितीत महत्त्वाचे आहे आणि आपण त्यावरच सभागृहात चर्चा करतोय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा सरकार करतंय. पण सत्यपाल मलिक यांनी २०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे, त्याचं काय? दुसऱ्यावर आरोप करणं आणि बोलणं सोपं आहे. पण जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थिती काय आहे? हे तिथे जाऊन बघितलं पाहिजे. किती नवीन हॉटेल्स सुरू झाल्या? किती रस्ते बांधले? अजूनही श्रीनगर आणि काश्मीरमधील परिस्थिती तशीच आहे. बदललेली नाही. सरकारने असं काय केलं आहे तिथे? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

श्रीनगरमध्ये जे कोण अधिकारी काम करत आहेत. ते महाराष्ट्रातील आहेत. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे, श्रीनगरचे निवडणूक अधिकारी, आयबीचे प्रमुख महेश दीक्षित, मेजर जनरल संजय विश्वराव, आयपीएस अधिकारी आनंद जैन, आणि संजय नहार हे सर्व महाराष्ट्रातले अधिकारी आहेत. ते श्रीनगरमध्ये काम करत आहेत. आमचं-तुमचं असं आम्ही करत नाही. आपण सर्व भारतीय आहोत. पण तुम्ही इतिहास समोर ठेवून इतरांवर गंभीर आरोप करता हे दुर्दैवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे आणि जितेंद्र सिंहांमध्ये शाब्दीक चकमक

सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले. जेवढ्या तुम्ही स्वतःला डोगरा समजतात, तितकाच मीही महाराष्ट्रीयन आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले. पण आम्ही इतिहासात जात नाही. अटलजींनी हे चांगलं केलं किवा वाईट केलं, असं आम्ही कधीच म्हणत नाही. तुम्ही अटलजींना विसरला असाल, पण आम्ही विसरलेलो नाही. अटलजी हे महान नेते होते, असे सुप्रिया सुळे बोलल्या.

सुप्रिया सुळेंच्या आरोपांना जितेंद्र सिंह यांनी पुन्हा उत्तर दिलं. आमच्या आई-वडिलांनी काय केलं हे आम्ही कशाला बोलू, अशी भावना काहींची आहे. नाही बोलले तरी चालेल. पण तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला सक्षम बनवलं, यामुळे तुम्ही आज लोकसभेत आहात. यामुळे आपल्या पूर्वजांना विसरून चालणार नाही. आपल्याला काय-मिळालं आणि काय नाही मिळालं, असं करून चालणार नाही. तुम्हीही आपल्या आई- वडिलांमुळेच इथेपर्यंत आला आहात, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

जितेंद्र सिंहांवर सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. आम्ही आमच्या घराण्याबद्दल चांगलंच बोलतो. काहीच अडचण नाहीए आम्हाला घराण्याची. पण डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, हे चालतं तुम्हाला. मग आमच्यामुळे तुमची काय अडचण होतेय? आई-वडील सोडून काहीही बोला. पण आई-बाप काढू नका, असा टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला. या जितेंद्र सिंह म्हणाले, वैयक्तिक घेऊ नका. आपल्या देशाचा इतिहास, समाजाची संस्कृती विसरता येणार नाही हा मुद्दा आहे, असे जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

supriya sule slams minister jitendra singh over kashmiri pandit issue in lok sabha

‘आई-बाप काढू नका’, सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले, लोकसभेत काय घडलं, पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here