नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत भारतातील निवडणुकीच्या राजकारणावर फेसबुक आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांचा प्रभाव थांबवण्याची मागणी सरकारकडे केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडण्यापासून या कंपन्यांना रोखण्याची गरज आहे. या विदेशी कंपन्या लोकशाहीला धोका आहे. सरकारने या कंपन्यांवर विराम लावला पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. त्यांनी लोकसभेत शून्य तासात हा मुद्दा उपस्थित केला. काही आंतरराष्ट्रीय मीडिया समूहांचा संदर्भ देत सोशल मीडिया कंपन्यांचा सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोपही सोनियांनी केला.

लोकशाही ‘हॅक’ करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला. सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे, तो आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे… मोठे औद्योगिक समूह आणि सरकार यांनी हातमिळवणी केली आहे, असा दावा त्यांनी केला. जागतिक सोशल मीडिया कंपन्या सर्व राजकीय पक्षांना स्पर्धा करण्यासाठी समान संधी देत नाहीत, हे वारंवार लोकांच्या लक्षात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या बाजूने द्वेषयुक्त भाषणाद्वारे फेसबुकने स्वतःच्या नियमांचे कसे उल्लंघन केले, याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले होते, ते सोनिया गांधी म्हणाल्या.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणुकीच्या राजकारणावर सत्ताधारी प्रस्थापितांच्या मदतीने फेसबुक आणि इतर सोशल मीडियाद्वारे प्रभावी उपयोग केला जात आहे. यामुळे त्यांचा पद्धतशीरपणे प्रभाव संपवावा, अशी आपली सरकारकडे मागणी आहे. देशातील लोकशाही आणि सामाजिक एकोपा जपला पाहिजे, यावर सोनियांनी यावेळी भर दिला.
फेसबुकवर प्रातिनिधिक जाहिरातदारांची विषारी प्रणाली फोफावत आहे आणि आपल्या देशाच्या निवडणूक कायद्यांची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप करत सोनियांनी आंतरराष्ट्रीय मीडिया समूह अल जझीरच्या वृत्ताचे उदाहरण दिले. फेसबुक स्वतःचे नियम मोडत आहे आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज पूर्णपणे दाबला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

sanjay raut : भाजपला आव्हान देण्याची तयारी; संजय राऊतांचे काँग्रेसबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले…

फेसबुकद्वारे ज्या प्रकारे प्रस्थापितांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने उघडपणे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे तो आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. भावनिक उत्तेजक प्रचार आणि प्रातिनिधिक जाहिरातींद्वारे तरुण आणि वृद्धांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे. फेसबुकसारख्या कंपन्यांना याची जाणीव आहे आणि ते त्यातून नफा कमवत आहेत, असे त्या पुढे म्हणाल्या.

शरद पवार-संजय राऊतांची दिल्लीत बैठक, असं काय बोलणं झालं? राजकीय चर्चांना उधाण
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, सत्ताधारी संस्था आणि Facebook सारख्या जागतिक सोशल मीडिया कंपन्या यांच्यात कसे संगनमत वाढत आहे हे मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडची बाब आहे. सत्तेत कोणीही असो आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्दाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन सोनिया गांधींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here