Nawab Malik | नवाब मलिक यांना जामिनावर सोडण्यासाठी पैशांची मागणी. दुबईतून फोन कॉल. नवाब मलिक यांचा मुलगा आमिर मलिक (Amir Malik) याने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

 

Nawab Malik ED
Nawab Malik: नवाब मलिक तुरुंगात गेल्यामुळे भाजपकडून सातत्याने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणला जात आहे.

हायलाइट्स:

  • २३ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना अटक केली होती
  • नवाब मलिक यांच्या खात्याचा कारभार दुसऱ्या नेत्यांकडे सोपवणार
मुंबई: आर्थिक गैरव्यवहार आणि कुख्यात गुंड दाऊदशी आर्थिक लागेबांधे असल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या सुटकेसाठी दुबईतून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांचा मुलगा आमिर मलिक (Amir Malik) याने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, आमिर मलिक यांना दुबईतून एका व्यक्तीचा फोन आला होता. नवाब मलिक यांना जामीन हवा असल्यास तीन कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे संबंधित व्यक्तीने म्हटले. तसेच हे पैसे बिटकॉईनच्या स्वरुपात द्यावेत, अशी मागणीही संबंधित व्यक्तीने केल्याचे समजते. या व्यक्तीचे नाव इम्तियाज असल्याचे समजते. आमिर मलिक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्यावेळी संबधित फोन दुबईवरून आल्याचे स्पष्ट झाले. (Nawab Malik son logdes FIR after call from Dubai demanded 3 crore to release his father)

२३ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत होता. त्यानंतर मलिक यांना आर्थर रोड तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले होते. नवाब मलिक तुरुंगात गेल्यामुळे भाजपकडून सातत्याने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणला जात आहे.

आधीच नवाब मलिक तुरुंगात; फडणवीस त्यांना अजून अडकवणार?

नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री

शरद पवार यांनी गुरुवारी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नवाब मलिक यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यापैकी अल्पसंख्याक खात्याचा कारभार जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास खात्याची धुरा राजेश टोपे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्यात येतील.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : phone call from dubai demands 3 crore in form of bitcoin to release nawab malik
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here