उल्हासनगर : रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर पाण्याने भरलेला फुगा मारला म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली. या मारहाणीत मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश गिझलानी असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. होळीच्या दिवशी जयेश हा कोचिंग क्लासेसवरून घरी परतत असताना काही मुलं नागरिकांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे मारत होते. जयेशच्या अंगावरही फुगा मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जयेशलाच बेदम मारहाण करण्यात आली. यात जयेशच्या डोळ्यांखाली गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं होतं. मात्र, पोलिसांना गुंगारा देऊन काही जणांनी त्याला पळून जाण्यास मदत केली. पोलिसांनी या प्रकरणातही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे जयेशच्या वडिलांनी पोलिसांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

Ambernath : मित्रांनी रंग लावू नये म्हणून गच्चीवर जाऊन लपून बसला; खाली पडून तरूणाचा मृत्यू

धुळवड साजरी करताना वाद, दोघांवर जीवघेणा हल्ला

होळी आणि धुळवड सर्वत्र आनंदाने साजरी केली जात असताना, उल्हासनगर शहरात धक्कादायक घटना घडली. धुळवड साजरी करत असताना किरकोळ कारणांवरून वाद झाला. त्या वादातून १० ते १५ जणांच्या टोळीने तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅम्प नंबर ४ च्या ब्राह्मण पाडा परिसरात ही घटना घडली. यात मंगल गुप्ता या तरुणाच्या डोक्यात दगड टाकल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून, विष्णू वैराठे आणि अवधूत साळवे हे तरूण किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला बाबा कदम, संगीत भोईर, प्रीतम कांबळे, अक्षय सोनवणे, यश कनोजिया आणि त्याच्या इतर १० साथीदारांनी केल्याचे अवधूतने सांगितले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Badlapur : धुळवडीत नाचून तरूण घरी गेला, थोड्याच वेळात झाला मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here