मुंबई: राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात विशेषत: मुंबईतही सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे मीठ उपलब्ध होत नसल्याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मीठाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात मुंबईमध्ये प्रतिदिन सुमारे २९.९ मेट्रिक टन इतका मीठाचा पुरवठा करण्यात आला आहे. मागील ५ दिवसांत सुमारे १४७ मेट्रिक टन इतका मीठाचा पुरवठा करण्यात आला आहे. आज या कंपनीमार्फत मुंबईमध्ये ६५ मेट्रिक टन इतका मीठाचा पुरवठा करण्यात आला असून दररोजच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. शिवाय या कंपनीकडे १ हजार मेट्रिक टन इतका शिल्लक साठा उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. शिवाय ही माहिती एकाच कंपनीची असून राज्यात मीठाच्या इतरही कंपन्यांमार्फत आवश्यक पुरवठा सुरु आहे, असे नमूद करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासंदर्भात संबंधित विविध विभागांचे सचिव हे सातत्याने वितरक, पुरवठादार, मोठे दुकानदार यांच्याशी संपर्क साधून आहेत. राज्यात सध्या कोणतीही टंचाई नसून पुढील दिवसांतही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here