मुंबई: राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेत राजकारण रंगताना दिसत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तिथीनुसार येणारी शिवजयंती भव्य स्वरुपात साजरी झाली पाहिजे, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला. कोणी काय करायचं हा आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी ते करावं, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
shivjayanti 2022: रेल्वे स्टेशनवर बसून संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांशी गप्पा मारतात तेव्हा….
यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी या माताीत जन्म घेतला हे महत्त्वाचं. महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना केवळ भुगोल आहे. महाराजांचं व्यक्तिमत्व थोर आणि महान आहे. त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं त्यांनी करावे, असे राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता मनसेकडून संजय राऊत यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
आजच्या शिवजयंतीस आम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांना…; शिवसेनेचा विरोधकांना थेट इशारा
एरवी राज्यातील तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती आणि शिवसेना हे म्हणजे अविभाज्य समीकरण होते. परंतु, राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना तारखेनुसार येणारी शिवजयंतीही साजरी करताना दिसत आहे. हीच गोष्ट हेरत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तिथीनुसार येणारी शिवजयंती उत्सवासारखी साजरी झाली पाहिजे, असे आदेश दिले होते. या माध्यमातून मनसे मराठीच्या मुद्द्यावरून आणखी आक्रमक होण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात तारखेनुसार येणारी शिवजंयतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली होती.

शिवजयंती साजरी करा पण तिथीवरून राजकारण नको: मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही शिवजयंतीच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका, असे आवाहन केले. तिथीनुसार शिवजयंती ही साजरी झालीच पाहिजे. पण त्यावरून राजकारण करण्याचे धंदे बंद करा. , मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करणं आता बंद झालं पाहिजे. राज्यातील तरुणांची अशीच इच्छा आहे. शिवाजी महाराजांकडे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून विश्वव्यापक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here