म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना संसर्गावर नियंत्रण मिळाले असले तरीही ताप व उष्णतेमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या त्रासाच्या लक्षणांकडे पालिकेच्या आरोग्यविभागाचे लक्ष असणार आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव इतर देशांमध्ये पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर खबरदारी घेण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे.

तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये डोकेदुखी, अंगदुखी, कणकण तसेच व्हायरल तापाचा त्रासही दिसून येतो आहे. खासगी व सार्वजनिक रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. करोनाचा संसर्ग जर पुन्हा वाढला तर कोणत्याही प्रकारे त्याचा त्रास मुंबईकरांना होऊ नये यासाठी पालिकेने रुग्णसंख्या वाढू शकणाऱ्या जागांवर लक्ष आणि आजारांच्या लक्षणांसंदर्भात सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.

वाचाः

पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णसंख्या वाढून करोनाचा संसर्ग फैलावेल, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्यविभागातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.

वाचाः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here