“भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचं. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा ३ वर्षांमध्ये फुटला,” असंही बंडातात्या यांनी म्हटलं आहे.
बंडातात्या कराडकर इतकंच बोलून थांबले नाही तर यावेळी त्यांनी महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणूनही उल्लेख केला. महात्मा गांधीजींना म्हाताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही. त्यानंतर भगतसिंग क्रांतीकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर १ हजार वर्ष लागली असती, असंही बंडातात्या कराडकरांनी म्हटलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता काय वाद पेटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.