औरंगाबाद : राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्यानंतर याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटताना पाहायला मिळत असून, ठाकरे सरकार सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तर कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या आणि लाखोंचा पगार असणाऱ्या आमदारांना मोफत घर कशासाठी? असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

मुंबईतील आमदार वगळता इतर सर्वपक्षीय आमदारांना गोरेगाव येथे म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुंबईबाहेरील आमदारांना मुंबईत घरे मिळत नसल्याच्या व त्यांना भाडेही परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.पण सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, सोशल मीडियावर लोकं आपली प्रतिक्रिया देत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय, तिकीटामध्ये सवलत हवी असेल तर…

आमदारांना वेतन किती?

राज्यातील आमदारांच मासिक वेतन २ लाख ४० हजार रुपये ९३७ रुपये वेतन असून, महागाई भत्ता ३० हजार ९७४ मिळतो. तर फोन बिल ०८ हजार रुपये, टपाल खर्च १० हजार,पीएचा पगार ३० हजार,संगणक चालकाचा पगार १० हजार, ड्रायव्हरचा पगार २० हजार आणि अधिवेशन काळात बैठकांचा दैनिक भत्ता ०२ हजार रुपये मिळतो. तर आमदारांना निवृत्ती वेतन ५० हजार रुपये मिळतो, तसेच निधनानंतर पत्नीला पेन्शन ४० हजार रुपये मिळतात.
मानलेला भावाने केला विश्वासघात; बहिणीच्या मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here