मुंबई: करोनाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात न येणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी केलं.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे. करोनाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात न येणं आणि करोनाची साखळी तोडणं ही सर्वांची जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले.

…तर तुरुंगात टाकू!

पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, यात्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातच करावीत. घराबाहेर पडू नये. सरकारने राज्यातील काही भाग सील करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here