Raj Thackeray | आपण या जातीपातींमधूनच बाहेर पडलो नाही तर हिंदू कधी होणार, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. राज ठाकरेंचा शिवसेनेवर घणाघात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

हायलाइट्स:
- राज ठाकरे यांनी मुंबई शहराच्या बकालपणाच्या मुद्द्यावर भाष्य केले
- हा बेहरामपाडा ‘मातोश्री’पासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर आहे
यावेळी त्यांनी वांद्रे परिसरातील बेहरामपाड्याचा उल्लेख केला. मी कॉलेजला असताना हार्बर लोकलच्या ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा वांद्रे कोर्टाच्या बाजूने जाताना सात ते आठ झोपड्या दिसायच्या. या भागाला बेहरामपाडा म्हणायचे. आज तोच बेहरामपाडा किती विस्तारला आहे, ते पाहा. याठिकाणी आता चार-चार मजल्यांच्या झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. हा बेहरामपाडा ‘मातोश्री’पासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर आहे. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता असूनही शिवसेनेने काहीही केलं नाही. त्यामुळे मुंबईत असे बेहरामपाडे वाढत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, तुम्ही ज्या ईडी आणि आयकर खात्याच्या धाडी टाकत आहात, त्यापेक्षा या झोपडट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाका. मुंबई पोलिसांना याठिकाणची सर्व माहिती आहे. या मदरशांवर धाडी टाकल्यावर तुमच्या हाताला काय काय गोष्टी लागतील, हे तुम्हाला कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. पाकिस्तान हवाय कशाला? उद्या काही घडलं तर आतलीच परिस्थिती आवरताना नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरल्या आहेत. पण आमचं लक्ष नाही, आम्हाला मतं हवी आहेत. आम्हीच त्या झोपडपटट्या आणि मदरसे वाढवत आहोत.अनेक मशिदी अशा आहे की, ज्याच्या आत नेमकं काय चालू आहे, हे समजत नाहीये. हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेले लोकं आहेत आणि आपल्या आमदारांना-खासदार, नगरसेवकांना याच्याशी काहीही देणघेणं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : pm narendra modi should raid on madrasas in mumbai slums we don’t need another pakistan says mns raj thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network