निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं आश्वासन
जगनमोहन रेड्डी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जनतेला अनेक आश्वासने दिली होती. यामध्ये जिल्ह्यांची संख्या वाढवत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा वेगळा जिल्हा करण्यात येईल, या आश्वासनाचाही समावेश होता. त्यानुसार आता अखेर तीन वर्षांनी रेड्डी यांनी या आश्वासनाची पूर्तता करत जिल्ह्यांची संख्या थेट दुप्पट केली आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोण झालं जिल्हाधिकारी?
नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जे. निवास, गुंटूरमध्ये विवेक यादव, पूर्वी गोदावरी येथे चेवुरी हरीकिरण आणि प्रकाशममध्ये प्रवीण कुमार यांना जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच श्रीकाकुलम येथे श्रीकेश लथकर, सूर्यकुमारी (विजयनगरम), ए मल्लिकार्जुन (विशाखापट्टनम), केवीएन चक्रधर बाबू (नेल्लोर), हरिनारायण (चित्तूर), विजयारामाजू (कडपा), पी कोटेश्वर राव (कुरनूल) आणि एस नागलक्ष्मी (अनथापुरम) यांना जिल्हाधिकारीपदावर कायम ठेवण्यात आलं आहे.