गडचिरोली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशा प्रकारचं हे सरकार असल्याची गंभीर टीका फडणवीसांनी केली आहे. खरंतर, आज गडचिरोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. याचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. याचवेळी बोलताना त्यांनी सरकारवर आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

‘करोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने बारमालकांचं भलं केलं. करोनाच्या काळात दुर्देवाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ५ हजार रुपये मदत करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. पण हे सरकार इतकं नालायक निघालं की, वेश्यांना द्यायचे पैसेही त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिले. म्हणजेच वेश्यांना द्यायच्या पैशांवरही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल.’ अशी गंभीर टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिक्षणाच्या माहेरघरात पालकांना बाऊन्सर्सकडून पुन्हा मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार
इतकंच नाहीतर हे विदेशी दारुवरचा कर अर्धा करण्याचं काम या सरकारने केलं. या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं, त्यांना बेवड्यांचं हीत जास्त आहे. या सरकारने सर्वसामान्यांना मदत केली नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

गडचिरोलीत सरकारविरोधात मोर्चा

दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्या, ओबीसी आरक्षण व इतर प्रश्नांवर गडचिरोलीत आज मोर्चा काढण्यात आला. या महाजनआक्रोश मोर्च्यात सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, किसन नागदेवे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष, आमदार देवराव होळी, कृष्णाजी गजबे, राजे अमरीशराव आत्राम, अरविंद पोरेड्डीवार भाजप नेते, बाबुराव कोहळे हे भाजप नेते उपस्थित होते.

सेना राष्ट्रवादीची वेळ संपली, आज काँग्रेसची पाळी, ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत राज ठाकरेंची खिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here