राज ठाकरे ऋतुप्रमाणे बदलतात; गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका
तसेच राज ठाकरे यांच्या समाजात तेढ पसरवणाऱ्या वक्तव्यांची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली पाहिजे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई झाली पाहिजे, असे मत सचिन खरात यांनी उपस्थित केले. यावर आता मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना एक विनंती केली होती. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना आताच काम लागलंय. कृपया महाराष्ट्र पेटवू नका, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते.राजसाहेब, महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनानंतर लोकांना आताच कामं लागली आहेत. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत. गॅस-पेट्रोल-डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय. याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत, असे ट्विट आव्हाड यांनी केले होते.