
Legends of Ramayana : डिस्कव्हरीवर दर्शन देणार श्रीराम
दिव्यानं स्वतःला कधीच ओळखलं नाही
दिव्या भारतीच्या आईनं मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘दिव्यानं स्वतःला कधीच नीट ओळखलं नाही. तिचं स्थान कुठं आहे, याची तिला जाणीवच नव्हती. तिच्यावर लोक किती भरभरून प्रेम करतात, याची थोडी जरी माहिती असती तरी तिनं स्वतःची काळजी घेतली असती. इतकंच नाही तर ही दुर्घटना देखील टळली असती.’
माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही
दिव्याच्या निधनानंतर अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये तिनं आत्महत्या केल्याचं नमूद केलं होतं. परंतु मीता भारती यांनी सांगितलं की, ‘दिव्या कधीच आत्महत्या करू शकत नाही. ती असं करूच शकत नाही. तिचा तो स्वभावच नव्हता. पण त्याचबरोबर तिची हत्या देखील झाली नाही. कुणी तिला का मारेल?’
अजून एक प्रेमभंग, अनन्या पांडे- ईशान खट्टरचं ब्रेकअप!
इमारतीमधून पडून झाला मृत्यू

५ एप्रिल १९९३ रोजी पाचव्या मजल्यावरून पडून दिव्या भारतीचं निधन झालं. त्यावेळी आलेल्या रिपोर्ट्सनुसार दिव्या भारती चेन्नईहून तिच्या सिनेमाचं चित्रीकरण संपवून परत मुंबईला आली होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्यावेळी ती वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर होती. तिची स्वयंपाकीण जेवण बनवत होती. दिव्या खिडकीत बसून तिला जेवणाच्या सूचना देत होती. अचानक तिचा हात सरकरला आणि ती ग्रील नसलेल्या खिडकीतून खाली पडली. या दुर्घटनेनंतर तातडीनं तिला कुपर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.