‘हवामान विभाग पुढील पाच दिवसांमध्ये उष्माघाताचा अॅलर्ट दिला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व आरोग्याशी संबंधित संस्था उष्माघातावरील उपचारासाठी सुसज्ज करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती आरोग्य विभागाचे रोग पाहणी अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
उष्माघाताच्या रुग्णांची स्थिती
९८
आतापर्यंतचे एकूण रुग्ण
६२
नागपूर विभाग
१५
अकोला विभाग
९
नाशिक विभाग
२
औरंगाबाद
एक
लातूर विभाग
९
पुणे विभाग
उष्माघाताचे संशयित मृत्यू : १०
३
जळगाव
२
नागपूर
प्रत्येकी १
अकोला, अमरावती, हिंगोली, जालना, उस्मानाबाद
उष्माघाताची लक्षणे काय?
चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे, भूक न लागणे, निरुत्साही होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता
उष्माघाताचा त्रास कोणाला?
अर्भक, लहान मुले, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणारे, हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्ती, खेळाडू; तसेच बराच वेळ घराबाहेर काम करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो.
राज्यात एक मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांची पाहणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व डॉक्टरांचे उष्माघात प्रतिबंधक, नियंत्रण आणि रुग्णांचे व्यवस्थापन यांचे ऑनलाइन प्रशिक्षण बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे.
– डॉ. प्रदीप आवटे, रोग सर्वेक्षण अधिकारी