मुंबई: भाजपशी संबंधित नेत्यांची एक माफिया टोळी ईडीची धमकी देऊन लोकांकडून पैसे उकळत आहे. हे पैसे थायलंड आणि बँकॉकमध्ये जमा केले जातात, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात थेटपणे भाजप नेत्यांचे नाव घेतले नसले तरी ही टोळी भाजपशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सूचित केले. आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा हे तर केवळ हिमनगाचे टोक आहे. आगामी काळात अशी अनेक प्रकरणं समोर येतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena leader Sanjay Raut slams BJP)
सोमय्यांचा जामीन फेटाळताच राऊतांचं ट्विट, ‘बाप बेटे तुरुंगात जाणार, देशमुख मलिकांच्या शेजारी राहणार’
ईडीच्या धमक्या देऊन कोणी कुठे पैसे जमा करायला लावले, हे आता समोर येईल. थायलंड आणि बँकॉकमध्ये हे पैसे जमा केले जायचे. आधी इथे आरोप करायचा, संबंधित व्यक्तीवर दबाव आणायचा, त्याला ईडी आणि सीबीआयच्या धमक्या द्यायच्या. तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली जायची. त्यानंतर सौदा करण्यासाठी बँकॉक आणि थायलंडला व्यवस्था करायची. तिथे पैसे स्वीकारायचे, असा प्रकार एका माफिया टोळीकडून सुरु आहे. या प्रकरणाशी भाजपचा तसा संबंध नाही. पण ही प्रकरणं लवकरच समोर येतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता संजय राऊत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यापाठोपाठ आणखी कोणत्या नेत्याला घेरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

INS Vikrant Fund: किरीट सोमय्यांनी राजभवनाला लिहिलेलं पत्र आलं समोर; चर्चगेट स्टेशनवर पैसे जमा केले, पण….
किरीट सोमय्यांना राऊतांचा खोचक टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत प्रकरणात राजकीय सूडाच्या भावनेने कारवाई किंवा आरोप केले जात नाहीत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या मनात भीती नसेल तर त्यांनी पोलिसांसमोर हजर झाले पाहिजे. किरीट सोमय्या महान नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत इतक्या लोकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली. लोकांनी कायद्यापासून पळू नये, ही प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली आणि आज तेच कायद्यापासून पळत आहेत. किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ते भूमिगत झाले आहेत, पळत आहेत. किरीट सोमय्या यांनी अशाप्रकारे पळू नये, असं माझं आवाहन असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here