सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहेत. अशात हा हल्ला भाजपने घडवून आणला असा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. तर यावर आता माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे.
इतकंच नाहीतर मला माझ्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास आहे. भाजप असं कृत्य करुच शकत नाही, असं मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे.