किरीट सोमय्या यांना का मिळालं अटकेपासून संरक्षण?
किरीट सोमय्या यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देताना न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ‘या प्रकरणात २०१३ ते २०२२ या कालावधीत कोणाचीही तक्रार नव्हती. शिवाय आता दाखल केलेली तक्रारही अस्पष्ट स्वरूपाची असून ती प्रसारमध्यमांतील वृत्तांच्या आधारे आहे आणि त्याआधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे,’ असं न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
‘विक्रांत’ युद्धनौका भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून ५८ कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉण्ड्रिंग केलं, असा आरोप शिवसेन नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपानंतर एका माजी सैनिकाने तक्रार दाखल केल्याने ट्रॉम्बे पोलीस स्थानकात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.