हिंगोली : कांदा बियाणे उत्पादनात घट होत असल्याने सद्या वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. सध्या कांदा बियाणे १ लाख रूपये क्विंटल म्हणजे १ हजार रूपये किलो कांदा बियाणे अश्या बातम्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून येत आहेत. या अफवेने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात अलीकडच्या काळात नगदी पिक म्हणून उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. कांदा पिक हे चार ते पाच महिन्यात तयार होते. त्यामुळे या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. यंदा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने कांदा लागवड २० ते २५ दिवस लांबली. कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार उशिरापर्यंत चाललेल्या लागवडीमुळे यंदा विक्रमी कांदा उत्पादन होईल,असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनीही कंबर कसली होती.

Kirit Somaiya: मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर किरीट सोमय्यांचा नवा आरोप, शिवाजी पार्कमधील बिल्डिंग उभारण्यासाठी काळा पैसाचा वापर
कांद्याला यंदा सुरुवातीपासूनच चांगला बाजारभाव असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत शेतकर्‍यांनी समसमान क्षेत्रात कांदा लागवड केली. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, खराब हवामान यामुळे कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब झाले. कांदा पिकात कोणतीही सुधारणा होत नसल्याने तब्बल ३०-४० टक्के कांदा उत्पादन घटण्याची भीती आहे. बियाणे कांद्याचे उत्पादन घेणारे काही शेतकरी काही कंपनी सोबत करार करुण लागवड करतात तर काही शेतकरी वैयक्तिक स्वरूपात लागवड करतात. सद्या हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाची छाटणी सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा पाय खोलात; कोर्टाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here