नवी दिल्ली : पश्चिम बंगाल (West Bengal), बिहार (Bihar), छत्तीसगड आणि महाराष्ट्र (Maharashtra) या चार राज्यातील ४ विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट होत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राजद आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार आघाडीवर आहेत. तर, पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा तर बालीगंज विधानसभा मतदारसंघातून बाबुल सुप्रिया आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो भाजपकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते मात्र राजीनामा देत त्यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Navneet Rana: शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, मी मातोश्रीवर येऊन दाखवते; नवनीत राणांचं ओपन चँलेज
कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. काँग्रेसनं त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली तर भाजपनं सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. कोल्हापूरमध्ये भाजपनं जोरदार प्रचार केला होता. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे मोठे नेते प्रचारात उतरले होते. चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये तळ ठोकून होते. मात्र, सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या नियोजनामुळं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेलं आवाहन यामुळं काँग्रेसच्या जयश्री जाधव या मतदारसंघातून निर्णायक आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार जयश्री जाधव यांना ८६ हजार ६७५ मतं मिळाली आहेत. तर, सत्यजीत कदम यांना ७० हजार ३४४ मतं मिळाली आहेत.
भोंगा प्रकरणात आता ओवेसींची एन्ट्री होणार; जयंत पाटलांचं भाकीत
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आघाडीवर
आसनसोल लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांना आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार २ लाख ६४ हजार ३१२ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमदेवार अग्निमित्रा पाल यांना १ लाख ५८ हजार ८५४ मतं मिळाली आहेत. तर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या पार्थ मुखर्जी यांना ३५ हजार ३३६ मतं मिळाली आहेत. बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा दिल्यानं या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली होती.

बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांना ९ हजार १०५ मतांची आघाडी मिळाली आहे. बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत १८ हजार ८७४ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कामरुज्जामन चौधरी यांना ३०४७ मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या केया घोष यांना १७४४ मतं मिळाली आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या शाह हलिम ९७६९ मतं मिळाली आहेत.
बिहारमध्ये राजद उमेदवार आघाडीवर
बिहारमधील बोचहा विधानसभा पोटनिवडणुकीत राजदचे उमेदवार आघाडीवर आहेत. १६ व्या फेरीनंतर राजदचे अमर पासवान २२ ८६४ मतांच्या आघाडीवर आहेत. अमर पासवान यांना ५३ हजार ४०५ मतं मिळाली आहेत. भाजपच्या बेबी कुमारी यांना ३० हजार ५४१ मतं मिळाली आहेत. वीआयपीच्या गीता देवी यांनी १६ हजार ९९८ मतं मिळाली आहेत.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर
छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर असून भाजप इथं देखील पिछाडीवर आहे. खैरागड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या यशोदा शर्मा १० हजार ४४ मतांनी आघाडीवर आहेत. १४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. आठव्या फेरीअखेर यशोदा शर्मा यांना ३३ हजार ५०० मतं मिळाली आहेत. तर, भाजपच्या कोमल जंघेल यांना २३ हजार ४६६ मतं मिळाली आहेत.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये भाजप विरोधक सत्तेत आहेत. त्या राज्यांमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर आहेत. तर, बिहारमध्ये भाजप आणि जदयूची सत्ता असून देखील राजदनं आघाडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here